दादाभाई नौरोजी
पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 25 जून 1869 रोजी झाला. त्यांचा मृत्यू 18 एप्रिल 1898 रोजी झाला. त्यांचे नाव दादाभाई पालनजी नौरोजी होते. त्यांच्या आईचे नाव
माणिका बाई होते. सुराज्याला स्वराज्याची सर येणार नाही, आम्हाला स्वराज्य पाहिजेत असे इंग्रज सरकारला ठासून सांगणारे पितामह दादाभाई
नौरोजी अतिशय बुद्धिमान होते. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांच्या निर्वाणानंतर आई सोबत
राहू लागले. पुण्यात कॉलेजात शिक्षण घेतले व तिथेच प्राध्यापक म्हणून काम करू
लागले. वाचन मनन याबरोबर दादा भाईंना खेळण्यातही रस होता. मुलांबरोबर मुलींना
सुद्धा शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी शाळा काढल्या. त्यांनी एक
वर्तमानपत्रही काढले. त्याचे नाव रास्त गो स्टार होते. ते गुजराती भाषेतून निघत
असे. आपल्या समाजाची स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे असे त्यांना वाटत असे.
म्हणूनच त्यांनी शाळा काढल्या व वर्तमानपत्रातूनही लोकांसाठी स्वलेख लिहिले. व्यापाराकरिता दादाभाई
इंग्लंडला गेले होते. भारतातील लोक अज्ञानी आणि अडाणी आहेत, रानटी आहेत असे तेथील लोक समजत. त्यांनी
व्याख्याने व लेख लिहून मत प्रसार
केला. देशात सुधारणा व्हाव्यात यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले स्वराज्य, स्वदेशीचा वापर व विदेशीचा बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे चार उपाय दादाभाईंनी देशाच्या प्रगतीसाठी आचरणात आणण्यास सांगितले. पितामह म्हणून
त्यांना संबोधले जात होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा