रविवार, १० फेब्रुवारी, २०१९



चला तर मग आपणही online होऊ या....
          ज्ञानश्रीवर्धन  blog हे  माहिती    तंत्रज्ञानाचे  उत्तम भांडार  आहे. शून्य  खर्चात व  कमी  वेळेत  अधिक  माहिती उपलब्ध  करण्याचे  साधन   म्हणजे ज्ञानश्रीवर्धन blog   होय. या blog वर  असणारी  माहिती  वेळेनुसार अद्ययावत करून  तिचे  विस्तारीकरण  करणे आवश्यक  आहे.श्रीवर्धन  तालुक्यातील शिक्षण  क्षेत्रातील  घडणार्‍या नाविण्यपूर्ण  घडामोडी विषयी सातत्याने  जाणीव करून  देणारे  व जागृत राहणारे माध्यम  म्हणजे  ज्ञानश्रीवर्धन blog होय. 
यामध्ये  online    डिजीटल  माहिती    
ज्ञान  लवकरात  लवकर प्राप्त होते. गुणवंत   शिक्षकांच्या  कला  कौशल्यांना    
सुप्त   गुणांना  चालना  देणारे  
एक online   व्यासपीठ  असणारा  हा  blog आहे.  मोबाईल  सारख्या  सहज  सोप्या  व सर्वांना हाताळण्यास सोप्या  असलेल्या या आधुनिक  उपकरणाच्या   माध्यमातून  शिक्षण क्षेत्रातील माहितीचा प्रचार  व प्रसार  करण्यासाठी  याचा   वापर  केला   
जातो.  श्रीवर्धन  तालुक्यात   
कार्यरत  असणार्‍या   शिक्षक    शिक्षण  
प्रेमींचे   शिक्षण   विषयक  संग्रहीत  ज्ञान  
कौशल्यांचेभांडार  या  blog  च्या  माध्यमातून  माहिती  होते.  ब्लॉगच्या  माध्यमातून 
 डिजिटल व ईलर्निंग   शिक्षणासाठी  देण्यात  येणार्‍या 
 सततच्या   प्रोत्साहनामुळे   विद्यार्थ्यांनाव  शिक्षकांना  त्यांच्या  
शिकण्याच्या   कलेवर  नियंत्रण  प्राप्त  
करता  येते.    त्यामुळे  ज्ञानार्जन  करण्याची  कला  अविरत  चालू ठेवता  येते. त्यामुळे ज्ञान  प्राप्त करणारा  ज्ञानार्थी  हा उत्तम वाचक   व लेखक  घडू  शकतो.  शिक्षकांमध्ये  आपापसात  online   चर्चा करायला  वाव  मिळून   online   आंतरक्रिया   घडते. 
        'Just  one  click   gather  all 
 information under  one  site'   या  प्रोत्साहनामुळे  
internet  web   हाताळण्याचा    
वापरण्याचा  आत्मविश्वास, प्रोत्साहन     ऊर्जा     निर्माण  होते.  blog  वर   online  अनुभव, माहिती , शेरे,  गुणनोंदी, 
सूचना  व टिपण्या   लिहून   ठेवता   येतात.  blog मुळे    नविन  तंंत्रज्ञान शिकू  शकतात.  blog च्या  वापरामुळे   
शिकण्याचा  खर्च    श्रम  कमी  
होतो.  ज्ञानाचा  प्रसार   जास्त  होतो.    blogging   मुळे  कार्यक्षेत्रातील    
त्याच्या   बाहेर     जाऊन   संपर्क  व्हायला   मदत  होते.  आणि  इतरांचे विचार , मत व  मन  वळवण्यासाठी   प्रोत्साहन  मिळते.   ज्यामुळे  शिक्षक व  ज्ञानार्थी   स्वावलंबी  बनतो.   अधिकारी,   पदाधिकारी,  संबधित    व्यक्तींना  , पालकांना व शिक्षकांना    विद्यार्थ्यांच्या कलागुणांबाबत   माहिती  मिळते.  blogging मुळे नविन  तंत्रज्ञान    माहिती होण्यास  मदत  होते.  विद्यार्थ्यांच्या  शिक्षणात   लक्ष  देण्यास  मदत  होते.  
blog  मुळेशिक्षक, पालक, विद्यार्थी, अधिकारी    पदाधिकारी  हे   पाहिजे 
 तिथे पाहिजे   त्यावेळी  शिकू  शकतात. सर्वांना   त्या  संबंधी    विचार  करण्यास   प्रोत्साहन  मिळते.blog  या  सर्वांचे  चर्चा व  विचारविनिमयाचे  माध्यम  बनते. त्यामुळे आजच्या digital युगात वावरतांना आपल्याला येणाऱ्या लहान-लहान digital problems वर आपण या blog द्वारे नक्की मात करू  आणि आत्मविश्वासाने या युगात सामावून जावू.

चला तर मग आपणही online होऊ या....




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानश्री वर्धन ब्लॉग वर आपले स्वागत...